Manoj Jarange Patil: ‘फाशी घेईन…’ जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या वक्तव्याने जरांगेही चक्रावले; पुढे काय घडलं?

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत उपोषण सुरू असून, पाचव्या दिवशी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.
Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest
Manoj Jarange Patil Maratha Reservation ProtestPudhari
Published on
Updated on

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत सुरू असलेले उपोषण पाचव्या दिवशीही कायम आहे. उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावत असताना सरकारकडून तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या एका वक्तव्याने काही क्षणांसाठी उपस्थितांमध्ये शांतता पसरली.

जरांगे पाटील यांनी 12 सप्टेंबरला मुंबईकडे जाण्याची भूमिका जाहीर केली आहे. मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी टप्प्याटप्प्याने मुंबईच्या दिशेने रवाना व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. मात्र, आझाद मैदानावर कोणीही जाऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला

जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी अंतरवाली सराटीत पोहोचून जरांगे यांची भेट घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी मित्तल यांनी सरकारकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती जरांगे यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकारच्या भूमिकेबाबत जरांगे समाधानी दिसले नाहीत.

‘तुम्ही सरकारची बाजू घ्यायला आला आहात का?’

चर्चेदरम्यान जरांगे यांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना सरकारची बाजू मांडण्याबाबत सवाल केला. त्यावर मित्तल यांनी प्रशासनाचा भाग म्हणून सरकारची बाजू मांडणे हे आपले काम असल्याचे सांगितले.

यानंतर सरकारवर टीका करताना जरांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. सरकारच्या धोरणांमुळे चांगल्या व्यक्तींवरही टोकाचे निर्णय घेण्याची वेळ येत असल्याचा संदर्भ त्यांनी दिला.

मात्र, जरांगे यांच्या या वक्तव्याचा वेगळा अर्थ घेत आशिमा मित्तल यांनी थेट प्रतिक्रिया दिली. नोकरी करताना फाशी घेण्याची वेळ आली तरी त्यासाठी आपली तयारी असल्याचे त्यांनी म्हटले.

मित्तल यांच्या वक्तव्याने काही क्षण शांतता

जिल्हाधिकारी मित्तल यांच्या या वक्तव्याने अंतरवाली सराटीतील वातावरण काही क्षणांसाठी स्तब्ध झाले. त्यानंतर जरांगे यांनी लगेच त्यांना थांबवत अशा प्रकारची भाषा करू नये, असे सांगितले.

‘तुम्ही जिल्हाधिकारी आहात, फाशी घेण्याची भाषा करू नका,’ अशा शब्दांत जरांगे यांनी त्यांना समजावले. एखादा प्रश्न सोडवता आला नाही म्हणून तुमच्यावर टीका होऊ शकते; मात्र त्यासाठी टोकाची भूमिका घेण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest
Gold Silver Rate Today: सोनं खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? दर घसरले; चांदीने मात्र वाढवली चिंता, जाणून घ्या आजचा भाव

‘तुम्ही कशाला या भानगडीत पडता?’

जरांगे यांनी आशिमा मित्तल यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रवासाचा उल्लेख करत त्यांना या वादात वैयक्तिकरित्या अडकू नये, असे आवाहन केले.

तुम्ही अभ्यास करून या पदापर्यंत पोहोचला आहात. UPSC आणि MPSCची तयारी करून प्रशासनात महत्त्वाची जबाबदारी मिळवलेल्या अधिकाऱ्यांनी राजकीय वादात ओढले जाऊ नये, असा सूर त्यांच्या बोलण्यात होता.

सरकारमधील काही मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना पाठवले जात असल्याची टीकाही जरांगे यांनी यावेळी केली. मात्र, अधिकारी म्हणून तुम्ही तुमचे काम करत राहा आणि या राजकीय वादात स्वतःला अडकवू नका, असा संदेश त्यांनी मित्तल यांना दिला.

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest
Twin Baby Death Case: लग्नाच्या 24 वर्षानंतर झाल्या जुळ्या मुली; 3 महिन्यांतच दोघींचा दुर्दैवी अंत, आईने असं का केलं?

उपोषण आणि मुंबई आंदोलनाच्या भूमिकेकडे लक्ष

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीवर जरांगे पाटील अद्याप ठाम आहेत. त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस सुरू असून प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त होत आहे. सरकारकडून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी अद्याप आंदोलन मागे घेण्याबाबत जरांगे यांनी भूमिका बदललेली नाही.

त्यामुळे आगामी काळात सरकार आणि जरांगे यांच्यातील चर्चेतून काय तोडगा निघतो आणि 12 सप्टेंबरच्या मुंबईकडे होणाऱ्या आंदोलनाबाबत पुढील निर्णय काय घेतला जातो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news