Manoj Jarange Patil Mumbai March Live: सरकारनं चर्चेला कुठंही यावं; जरांगे मुंबईकडे कूच; योग्य वेळी मराठा बांधवांना बोलवणार

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilpudhari

जरांगे पाटील मुंबईकडे होणार कूच

Manoj Jarange Patil Mumbai March Live: मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या घेऊन आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज मुंबईकडे कूच करणार आहेत. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना त्यांनी माझ्यासोबत येऊ नये अशी सूचना केली आहे.

निघण्यापूर्वी पुढारीशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याचं सांगिण्यात आलं. मनोज जरांगे पाटील हे जलाना इथून मुंबईकडे फक्त ४ गाड्या घेऊन निघणार आहेत. त्यांच्यासोबत कोणी येऊ नये अशी देखील सुचना त्यांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत देखील वाढ केली आहे. पोलीस विभागाची विशेष सुरक्षा असणार आहे. अंतरवाली ते मुंबईपर्यंत जरांगेंना विशेष सुरक्षा पुरवण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

सरकारसोबत कुठंही चर्चा 

मनोज जरांगे पाटील हे जरी मुंबईकडे निघाले असले तरी त्यांनी सरकारनं कुठंही चर्चेला यावं असं सांगत या पाच दिवसाच्या प्रवासात कधीही यावर तोडगा काढला जाऊ शकतो असे सूतोवाच देखील त्यांनी दिले.

अठराव्या दिवशीही उपोषण सुरू 

मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण आंदोलन १८ व्या दिवशी देखील सुरू ठेवलं आहे. अशातच ते मुंबईकडे कूच करणार आहेत.

मनोज जरांगे यांच्या तिसऱ्या परवानगी अर्जावर अद्याप निर्णय नाही

मनोज जरांगे यांच्याकडून आंदोलनाच्या परवानगीसाठी तिसरा अर्ज परवानगी अर्ज करण्यात आला आहे. मात्र अद्याप त्याच्यावर कोणता निर्णय झालेला नाही. यापूर्वी केलेले दोन अर्ज पोलिसांनी लागेच फेटाळले होते मात्र या अर्जावर विचारविनिमय सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळी ११ वाजता जालना सोडणार 

मनोज जरांगे पाटील हे सकाळी ११ वाजता अंतवाली सराटीमधू मुंबईकडे कूच करणार आहेत. त्यांच्या पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

ताफ्यात फक्त ४ गाड्या 

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना माझ्या सोबत येऊ नका असा सल्ला दिला असून ते जालना येथून फक्त ४ गाड्यांच्या ताफ्यासह निघणार आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news