MLA Santosh Danve : बोगस बियाणे प्रकरणी कारवाई करा

आ. संतोष दानवे यांच्या कृषी विभागाला सूचना, कृषी विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद
Fake seeds action
Fake seeds actionpudhari photo
Published on
Updated on

भोकरदन ः बोगस बियाणे, मिरची पिकाची बोगस रोपे विक्री करणाऱ्या अनधिकृत खाजगी रोपवाटिका, कृषी सेवा केंद्र आणि बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ तपासणी करून कठोर कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना आ. संतोष दानवे यांनी कृषी विभागाला दिल्या आहे. पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी भोकरदन आणि जाफ्राबाद यांना सूचना दिल्या.

मिरची पिकाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची फसवणूक होऊन त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत बोगस बियाणे आणि बोगस रोपे विक्री करणाऱ्या कंपन्या आणि विक्रेत्यांविरुद्ध कठोर कार्यवाही करणे बाबत मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आमदार संतोष पाटील दानवे यांना प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवता यावे व त्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे व मिर्चीची रोपे मिळवून देता यावीत म्हणून आमदार संतोष पाटील दानवे यांनी कृषी विभागातील उच्चपदस्थ अधिकार्यांना या सूचना दिल्या आहेत.

Fake seeds action
शेतकऱ्यानी चक्क गाढवांना खाऊ घातले गुलाबजामून; काय आहे कारण?

आ.दानवे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना बोगस बियाणे आणि रोपे विक्री करणारे खाजगी विक्रेते व रोपवाटिका या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान करतात. या विक्रेत्यांचे सदोष व अयोग्य उत्पादने शेतकऱ्यांच्या मेहनतीला वाया घालवतात आणि शेतीतील उत्पादन घटवतात. या अनधिकृत रोपवाटिका व विक्रेत्यांकडून विक्री केल्या जाणारे बोगस बियाणे व रोपांची त्वरित आणि कडक तपासणी करण्यात येईल, आणि त्यात काही गैरप्रकार आढळून आल्यास त्यांच्यावर आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि त्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने विशेष तपास पथक तयार करावे, जे या प्रकारच्या विक्रीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकेल. जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि संबंधित अधिकारी यांना याबाबतच्या तपासणीसाठी प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.

Fake seeds action
Gangapur News : ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकांना फटका

शेतकऱ्यांची सुरक्षा: शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी संबंधित विभागांनी शेतकऱ्यांना योग्य आणि प्रमाणित बियाणे व रोपे मिळवून देण्याची व्यवस्था केली पाहिजे. यासाठी कृषी सेवा केंद्र आणि सरकारी अधिकाऱ्यांनी अधिक सक्षम होऊन कार्य करावे.

माझ्याशी संपर्क साधावा

आमदार संतोष पाटील दानवे यांनी शेवटी सांगितले की, शेतकऱ्यांच्या हिताच्या रक्षणासाठी शासनाच्या प्रत्येक योजनेला यशस्वी करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळवून देणे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे यास आपले पहिले प्राधान्य असून बोगस बियाणे व बोगस रोपे विक्री करणाऱ्या विक्रेत्याकडून फसवणूक झाल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.

विक्री करणाऱ्यांवर कारवाई

बोगस बियाणे आणि रोपे विकणाऱ्यांना जी माहिती मिळेल, त्या आधारावर त्यांना दंड किंवा बंदी घालण्याची कारवाई केली जाईल. हे सुनिश्चित करण्यात येईल की शेतकऱ्यांचा आर्थिक शोषण होणार नाही.

कृषी विभागाची सक्रिय भूमिका

कृषी विभागाची सक्रिय भूमिका कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी एक हेल्पलाइन तयार केली पाहिजे, ज्यामुळे शेतकरी योग्य मार्गदर्शन घेऊ शकतील. तसेच, कृषी सेवा केंद्र आणि बियाणे विक्रेत्यांवर नियमित निरीक्षण ठेवून त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news