सततच्या पावसाने कपाशीचे नुकसान; शेतकरी झाला हवालदिल

सततच्या पावसाने कपाशीचे नुकसान; शेतकरी झाला हवालदिल
jalna news
सततच्या पावसाने कपाशीचे नुकसान; शेतकरी झाला हवालदिलpudhari photo
Published on
Updated on

रोहीलागड, पुढारी वृत्तसेवा कपाशीच्या बोंडाना कोंब फुटल्याने उत्पादनात होणार घट शेतकरी हवाल दिल, या वर्षी मृग नक्षात्रात लागवड झाल्यामुळे शेतकरी आनंदी होता. या वर्षी तरी कपाशीचे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडेल परंतु सततच्या पावसामुळे उत्पनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याचे शेतकऱ्यांच्या चर्चेतून व्यक्त होत आहे.

नैसर्गिक आपत्ती सततचा पाऊस आणि रो- गराई यासारखे शेतकऱ्यांपुढे उभे असल्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न होई आशा मावळल्या आहे, वेचणीस आलेल्या कपाशीचे बोंडे सततच्या पावसामुळे नासाडी होत आहे. त्यामुळे निसर्ग शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून नेतो की काय एकीकडे कपाशीची बोंडाची नासाडी तर दुसरीकडे शेतकऱ्याच्या मालाला बाजारात चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिन झालेला दिसत आहे.

अंबड तालुक्यातील रोहिलागड परिसरात कपाशी वेचणीला सुरुवात झाली आहे. आठ दिवसापासून सतत पाऊस येत असल्यामुळे कापूस वेचणी व्यत्य येत आहे. सततच्या पावसामुळे त्यावर करता आणि लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी पिकाला लागलेला खर्च निघेल का नाही असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. पंचनामे करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

कपाशीचे मुख्य पीक असल्यामुळे शेतकऱ्याचे वार्षिक आर्थिक नियोजन राहते. परंतु सततच्या पावसामुळे पीक हाती यईल असे दिसत नाही.

बाळासाहेब टकले, शेतकरी

jalna news
लोणी धामणी : सततच्या पावसाने शेतीचे नुकसान; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news