![ओमप्रकाश राजे निंबाळकर](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F12%2F%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%93%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी मोठी आघाडी घेतली आहे. सध्या १९ वी फेरी सुरू आहे. आतापर्यंत ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना 480479 मते आहेत. तर राष्ट्रवादी – अजित पवार गटाच्या अर्चनाताई पाटील यांनी 274159 मतांची आघाडी घेतली आहे. निंबाळकर 206590 मतांनी आघाडीवर आहेत.
धाराशिवमध्ये अजित पवार यांच्या गटाला मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान, निंबाळकर यांच्या विजयाचा जल्लोष सुरु आहे. धाराशिव मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. सभा, प्रचार रॅली यांच्या माध्यमातून महायुतीने खूप प्रयत्न केले. निंबाळकर यांनी असा विश्वास व्यक्त केला होता की, 'खासदार मीच होणार आणि दिल्लीला जाणार'. त्यांचा हा विश्वास पूर्ण होताना दिसत आहे.