Nathsagar Dam : नाथसागर धरणातून खरीप हंगामासाठी पाण्याचा विसर्ग

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी अहिल्यानगर या जिल्ह्यांतील दोन लाख चाळीस हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्याची शेती सिंचन होणार
Nathsagar Dam
Nathsagar Dam : नाथसागर धरणातून खरीप हंगामासाठी पाण्याचा विसर्ग File Photo
Published on
Updated on

Water released from Nathsagar Dam for Kharif season

पैठण, पुढारी वृत्तसेवा जुलै महिन्यात नाशिकसह नाथसागर धरणाच्या वरील भागातून पैठण येथील धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक जमा होऊन धरणामध्ये बुधवारी (दि.१६) सायंकाळी सहा वाजेपर्यंत ७७.१७ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला.

Nathsagar Dam
Manoj Jarange : नेत्यांची हुजरेगिरी सोडा; मुलांच्या शिक्षणावर लक्ष द्या

सध्या पाण्याची आवक ४ हजार ३११ क्युसेक सुरू असल्याने पाणी वाटप नियोजन समितीच्या धोरणानुसार सन २०२५-२६ खरीप हंगामासाठी येथील नाथसागर धरणाच्या उजवा व डावा कालव्यातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी घेतला आहे.

सायंकाळी शाखा अभियंता मंगेश शेलार, गणेश खरडकर यांनी या दोन्ही कालव्यांतून ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला. टप्प्याटप्प्याने हा विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

Nathsagar Dam
Manoj Jarange : नेत्यांची हुजरेगिरी सोडा; मुलांच्या शिक्षणावर लक्ष द्या

मराठवाड्यातील शेतीसाठी वरदान असलेल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी अहिल्यानगर या जिल्ह्यांतील दोन लाख चाळीस हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्याची शेती सिंचन होणार असून, यामुळे चालू हंगामातील खरीप हंगामासाठी वेळेवर पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्याकडून आनंद व्यक्त केल्या जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news