Struggle Basic Facilities | घर गाठण्यासाठी नागरिकांची जीवघेणी कसरत

मृतदेहाला न्यावे लागते रेल्वे रूळ ओलांडून : राजनगर, बंबाटनगर, मुकुंदनगरची अवस्था दुर्गम खेड्यापेक्षाही वाईट
छत्रपती संभाजीनगर
जगण्यासाठी झुरावे लागते. अवघड ओझे डोक्यावर वाहावे लागते. डोक्यावर सिलिंडर घेऊन जीव धोक्यात घालून रेल्वेरूळ ओलांडताना राजनगर येथील महिला. शाळकरी मुलांना देखील जीव मुठीत धरून घर गाठताना रुळ ओलांडावा लागातोय. (छाया: सचिन लहाने)
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : घर गाठण्यासाठी राजनगर, बंबाटनगर आणि मुकुंदनगर या परिसरातील नागरिकांना जीवघेणी कसरत करावी लागत असून, या भागात मूलभूत सुविधांचा मोठ्याप्रमाणावर अभाव आहे.

Summary

राजनगर, बंबाटनगर आणि मुकुंदनगर या भागात ना रस्ते, ना पिण्याचे पाणी, अंत्यविधीसाठी मृतदेहालाही रेल्वेरूळ पार करून न्यावे लागते. येथील रहिवाशांना दुर्गम खेड्यापेक्षाही वाईट अक्षरशः माणसालाही लाज वाटावी या स्थितीत जीवन जगावे लागत आहे. पावसाळ्यात ही स्थिती अधिकच बिकट होते.

शहराचा भाग असलेल्या राजनगर, बंबाटनगर आणि मुकुंदनगर भागात बहुतांश कामगारवर्ग वास्तव्याला आहे. हात मजूर, कंपनीत सकाळपासून ते रात्रीपर्यंत कष्ट करून थकलेले नागरिक जेव्हा घरी परततात, तेव्हा त्यांना रेल्वे रुळाच्या अलीकडे आपली वाहने उभी करावी लागतात. त्यानंतर चिखल तुडवत अंधारात वाट शोधत घर गाठावे लागते. या परिसरात रस्ता नसल्यामुळे नागरिकांना गॅस सिलिंडरसारखी जड वस्तूही डोक्यावरून वाहून घरी न्यावी लागते. महिलांसह वृद्धांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच शाळकरी मुलांना शाळेत ने-आण करण्यासाठी महिलांना रेल्वे रूळ पार करत धोकादायक कसरत करावी लागते. या मागीवर अपघातांची मालिकाच सुरू असते.

छत्रपती संभाजीनगर
Chhatrapati Sambhajinagar : बाधित व्यावसायिकांसाठी व्यापार संकुल उभारणार

तर या भागातील सुरक्षा व्यवस्था असून, नसल्यासारखी आहे. एवढेच नव्हे, तर अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्यासाठीही रस्ता उपलब्ध नसल्याने कुटुंबीयांना तासनतास वाट पाहावी लागते किंवा मृतदेह उचलून कसरत करत रूळ ओलांडून न्यावा लागतो. या भागात पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. नळद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते. यासंबंधी महापालिकेकडे तक्रारी केल्या. तसेच मंत्री, खासदार, आमदार व नगरसेवकही निवडणुकीवेळी मत मागण्यापुरते येतात. त्यानंतर या भागाकडे दुर्लक्ष करतात. दरम्यान पावसाळ्यात ही स्थिती अधिकच बिकट होत असते. हा भाग शहराचा असूनही गावापेक्षा वाईट अवस्था आहे. या वसाहतींना तातडीने नागरी सुविधा द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली असून अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

मूलभूत सुविधा द्या

राजनगर, बंबाटनगर आणि मुकुंदनगर भागात पक्का रस्ता तयार करावा, पिण्याच्या पाण्याची नियमित व्यवस्था करावी, रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग उभारावा, पथदिवे व्यवस्था सुधारावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news