पैठण, पुढारी वृत्तसेवा: सोनवाडी बु. येथील ग्रामसेविका सुहासिनी यादवराव कळसकर यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती. परंतु त्यांच्यावर अद्यापही निलंबनाची कारवाई झालेली नाही. त्यामुळे त्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी पंचायत समितीसमोर दोन दिवसांपासून बळीराम रघुनाथ नवले (रा. सोनवाडी बु.) यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. Chhatrapati Sambhajinagar News
पैठण सोनवाडी बु. येथील ग्रामपंचायत अंतर्गत कब्रस्तान बांधकामाचे बिल काढण्यासाठी सुहासिनी यादवराव कळसकर यांनी २७ हजार रुपयांची लाच घेतली होती. सहा महिन्यापूर्वी एका खासगी बँकेतील कॅशियरमार्फत ही लाच घेताना त्यांना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. या प्रकरणात सुहासिनी यादवराव कळसकर यांना अद्याप निलंबित केलेले नाही. Chhatrapati Sambhajinagar News
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अंतर्गत सन २०२१ व २०२२ या कालावधीमध्ये सोनवाडी बु.येथील ग्रामपंचायती च्या माध्यमातून उपसरपंच संगीता बळीराम नवले यांचे पती बळीराम नवले यांनी कब्रस्तान परिसरात संरक्षण भिंतीचे बांधकाम केले होते. या बांधकामाचे बिल काढण्यासाठी ग्रामसेविका सुहासिनी यादवराव कळसकर यांनी पाच टक्के रक्कम लाच मागितली होती. तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारी अनुसार जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोनि मुटेकर यांच्या पथकाने सदरील ग्रामसेविका कळसकर यांनी एका खाजगी बँकेच्या कॅशियर मार्फत २७ हजार रुपये लाच स्वीकारताना कारवाई केली होती.
परंतु सहा महिने उलटले तरीही संबंधित ग्रामसेविकावर निलंबित कारवाई करण्यात न आल्यामुळे पैठण पंचायत समिती कार्यालयासमोर बळीराम नवले यांनी आमरण उपोषण सुरू केले. यासंदर्भात पंचायत समिती गट विकास अधिकारी उषा मोरे व कार्यालयीन प्रशासन अधिकारी राजेश कांबळे यांनी सदरील अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविला असल्याचे सांगितले.
हेही वाचा