Mantha Taluka : मंठा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा

किसान ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Mantha Taluka
Mantha Taluka : मंठा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर कराfile photo
Published on
Updated on

Declare Mantha Taluka as drought-affected

मंठा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात यावर्षी वरून राजाची आवकृपा झाल्याने खरिपाची संपूर्ण पिके पाण्या अभावी जळून गेली आहेत. मंठा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा, अशी मागणी किसान ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

Mantha Taluka
Sillod News : सुरेश बनकर यांची भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

निवेदनात म्हटले की, सुरवातीला पेरणीलायक पाऊस झाला व त्यावर खरिप पेरणी झाली. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडिद, हळद, ऊस इत्यादी खरीपाची पिके पाण्याअभावी बहरात येऊन जळून गेली असल्याने बळीराजाच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणाने हिरावला गेला आहे.

मागील दोन महिण्यापासून पाऊस नसल्यामुळे खरिपामधील उभी पिके जळून गेली असल्याने तालुक्यातील संपूर्ण शतेकरी चिंताग्रस्त झाले आहेत. मुक्या जणावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यात सर्वत्र आज रोजी चैत्र, वैशाख महिन्या प्रमाणे उष्णता निर्माण झाली आहे. त्यामुळे मंठा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी किसान ब्रिगेड तालुकाध्यक्ष विजयकुमार देशमुख व शेतकरी पदाधिकारीच्या वतीने यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.

Mantha Taluka
Kapus Kisan app : कापूस विक्रीसाठी 'कापूस किसान' ॲपवर नोंदणी आवश्यक

या निवेदनावर विजयकुमार देशमुख सह उत्तम गणपत राठोड, प्रल्हाद सखाराम रागडे, गजानन घुगे, उत्तम नारायण घुगे, शिवकुमार देशमुख, संजय श्रीराम चव्हाण, प्रल्हाद फुफाटे यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांनी सह्या केलेले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news