

Bullock Cart Protest in Beed for Jayakwadi Water
बीड : पुढारी वृत्तसेवा येत्या दीड महिन्यात गोदावरी सिंदफणा नदीजोड प्रकल्प व उपकालव्याचे सर्वेक्षण करा, १६८ टीएमसी मध्ये बीड जिल्ह्यातील शेतीला हक्काचे पाणी द्या यासह इतर मागण्या पूर्ण करा, अशी मागणी विराट बैलगाडी मोर्चातून रखरखत्या उन्हात आलेल्या शेतकऱ्यांनी केली.
मागणीची पूर्तता न झाल्यास पायी दिंडी काढत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला. बीडमध्ये शेतकऱ्यांनी जायकवाडीच्या पाण्यासाठी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
यावेळी कालीदास आपेट, सुशीलाताई मोराळे, भाऊसाहेब जरांगे पाटिल, समन्वयक दिनेश गुळवे, राहुल लोंढे, अप्पासाहेब महानोर, बाबुराव जेठे, अप्पासाहेब तळेकर, मोहन गुंड, कुलदिप करपे, संतोष भारती, बालासाहेब कोळेकर, राजाभाऊ महाराज कुटे, परमेश्वर वाघमोडे, देविदास वाणी, महादेव गायकवाड,
संजय जाधव, ज्ञानेश्वर शेरकर, गोरक्ष परदेशी, शामराव घुगे, भास्कर मार्कड, पपू पवळ, महादेव रडे, जालिंदर रसाळ, बप्पासाहेब रत्नपारखे, अशोक काळे, लक्ष्मण नागरगोजे, सुधाकर नागरगोजे, रामेश्वर गाडे, काशीनाथ जोगदंड, राज सवासे, राजाराम निर्मळ, लक्ष्मण काशीद, भारत पवार, साई गावडे, बळीराम राक्षे, अजय गोयकर, गणेश हाडुळे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.