

बीड : भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली. बीड ते नवगण राजुरी या मार्गावर हा अपघात घडला. कैलास टूले, अक्षय शिंदे, ऋषिकेश फुलझळके अशी अपघातामध्ये ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हे तिघेजण दुचाकीवरून आपल्या गावी परत जात होते.
बीड ते नवगण राजुरी मार्गावरील उकंडा फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगातील ट्रकने धडक दिली. अपघातामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तिघांचे मृतदेह रुग्णालयात दाखल केले.