

केज :- बायको नांदायला येत नसल्याने वैतागलेल्या एका नवऱ्याने चक्क आपल्या मेव्हण्याचे हॉटेल पेटविले. यात हॉटेल मधील ७० ते ८० हजार रु. चे सामान जळून नुकसान झाले आहे.या प्रकरणी दाजी विरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील कदमवाडी नानाभाऊ कदम यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचे लग्न आठ वर्षा पूर्वी सोनिजवळा येथील तानाजी रामदास गायकवाड याचे सोबत झालेले आहे. त्यांना तीन मुलेदेखील आहेत. तानाजी गायकवाड हा नेहमी त्याची पत्नी ज्ञानेश्वरी हिला मारहाण करीत असल्याने; ज्ञानेश्वर ही तिच्या तिन्ही मुलांसह माहेर कदमवाडी ता. केज येथे तिचा भाऊ आसाराम कदम यांच्याकडे रहायला आलेली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी ती माहेरी गेली आहे. त्यामुळे तिचा पती तानाजी गायकवाड हा कदमवाडी येथे येऊन जर त्याची बायको ज्ञानेश्वरी हिला त्याच्याकडे नांदायला पाठविले नाही तर जीवे मारणार. अशी धमकी मेव्हणे आसाराम कदम याला दिली.
दरम्यान दि. १५ सप्टेंबर रोजी तानाजी गायकवाड याने रात्री मेव्हणा आसाराम कदम याचे केज-बीड रोडवर टाकळी शिवारातील असलेले चहापाण्याचे हॉटेल कोणी पेटवून दिले. या आगीत हॉटेलचे पत्र्याचे शेडसह हॉटेलमधील डीप फ्रिज, साधा फ्रिज, काउंटर, खुर्च्या, टेबल, पाण्याचे जार व इतर साहीत्य जळून खाक झाले आहे. या आगीत सुमारे ७० ते ८० हजार रूपयाचे नुकसान झालेले आहे.
आसाराम कदम यांच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात तानाजी गायकवाड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुकुमार उर्फ राकेश बनसोडे हे तपास करीत आहेत.
या पूर्वीही मारहाणीची केली होती पत्नीने तक्रार
तानाजी कदम हा त्याची पत्नी ज्ञानेश्वरी हिस मारहाण करून छळ करीत असल्याने या पूर्वी ज्ञानेश्वरी हिने युसुफ वडगाव पोलिस ठाण्यात त्याच्या विरुद्ध दोन वेळा तक्रार दिलेली आहे.