बीड: बालवाडीतून घरी येताना चिमुकला नाल्यातून गेला वाहून

बीड: बालवाडीतून घरी येताना चिमुकला नाल्यातून गेला वाहून

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : गेवराई शहरामध्ये सकाळपासून धुवाँधार पाऊस पडत आहे. या पावसाने नद्या-नाल्यांना पाणी आले आहे. दरम्यान, तीन वर्षीय मुलगा बालवाडीतून घरी येत असताना पाय घसरल्याने नाल्यातून वाहून गेल्याची घटना आज (दि.२६) दुपारी घडली. हा मुलगा विद्रुपा नदीमध्ये वाहून गेला असल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळी तहसीलदारांसह प्रशासकीय अधिकारी दाखल झाले होते.

गेवराई शहरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे चिंतेश्वर गल्लीतील नाल्याला पाणी आले होते. दुपारी बंटी ज्ञानेश्‍वर क्षीरसागर हा तीन वर्षीय मुलगा बालवाडीतून घरी येत होता. त्याचा पाय घसरल्याने तो नाल्यात पडला आणि वाहून गेला. त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो आढळून आला नाही. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सचीन खाडे, सपोनि संतोष जवंजाळ घटनास्थळी दाखल झाले. अद्याप शोधकार्य सुरू आहे.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news