बीडमधील हिंसाचाराची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी : धनंजय मुंडे

बीडमधील हिंसाचाराची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी : धनंजय मुंडे
Published on
Updated on

बीड : पुढारी वृत्तसेवा : बीडमधील हिंसाचार हे मोठे षड्यंत्र असून याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. बीड शहरातील हिंसाचाराची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी 'शीवछत्र' या पंडीत कुंटूंबाच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

संबंधित बातम्या 

या परिषदमध्ये धनंजय मुंडे म्हणाले की, बीडमध्ये ज्या पद्धतीने दुर्दैवी घटना घडल्या होत्या तशा कधीच घडल्या नव्हत्या. अर्थाचा अनर्थ काढून जिल्हा पेटविण्याचा प्रयत्न समाज कंटकांनी केला. आतापर्यंत घडलेल्या घटनेचा निषेध कधी कोणाच्या घरापर्यंत पोहोचले नव्हता. जो घटनाक्रम आहे, त्यावरून हे फार मोठे षड्यंत्र असल्याचे स्पष्ट आहे. माजलगावात हिंसाचार रोखण्यासाठी पोलिस गेल्यानंतर बीड शहरात टार्गेट करुन दगडफेक, जाळपोळ झाली.

एक हजार- पाचशे लोक पंधरा किलोमीटर जाऊन हॉटेल कसे जाळतात? ठरवून प्रत्येक ठिकाणी हिंसाचार झाल्याचे दिसत आहे. पोलिस देखील हतबल झाल्याचे चित्र आहे. या हिंसाचारातील प्रत्येकाला शिक्षा झाली पाहिजे. यासाठी या संपूर्ण प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी झाली पाहिजे. एसआयटीमार्फत चौकशीची मागणी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना करणार आहे असे धनंजय मुंडे म्हणाले.

पोलिस बळ कमी पडले हे वास्तव असले तरी पोलीसांची गुप्तचर यंत्रणा कमी पडणार नाही हे स्पष्ट आहे असेही मुंडे म्हणाले. यावेळी माजी आ. अमरसिंह पंडित, सुभाष राऊत, योगेश क्षीरसागर, सचिन मुळूक, कुंडलिक खांडे, राजेश्वर चव्हाण, अविनाश नाईकवाडे आदींची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news