पक्षाकडे दुर्लक्ष केल्याने गद्दारांना संधी मिळाली : खा. बंडू जाधव | पुढारी

पक्षाकडे दुर्लक्ष केल्याने गद्दारांना संधी मिळाली : खा. बंडू जाधव

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा :  परभणीचे खासदार बंडू (संजय) जाधव यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला आहे. जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते तर त्यांनी आदित्य ठाकरेंना मंत्री करायला नको होते, कुणाकडे तरी पक्षाचे नेतृत्व द्यायला हवे होते असे वक्तव्य केले आहे.

औंढा नागनाथ येथे शनिवारी एका कार्यक्रमात खासदार जाधव म्हणाले की, सत्ता असताना अडीच वर्षे आमचा जो लाभ व्हायला हवा होता तो झाला नाही. तो काळ असाच गेला, याचे दुःख होते. ही वस्तुस्थिती आहे. मी केवळ त्यावर बोलतोय. ठाकरेंनी ज्यावेळी पक्ष संघटनेला वेळ द्यायला हवा होता किंवा कुणाला तरी पक्ष संघटनेकडे बघण्याची जबाबदारी द्यायला हवी होती, तेव्हा ती दिली नाही. म्हणून या चोरांना संधी मिळाली, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला. ते पुढे म्हणाले की, दोघांनी खुर्च्या आटवल्यामुळे ही गद्दारी झाली. बाप गेला की पोरगा आपल्या बोकांडी बसेल, या भावनेतून गद्दारी झाली.

Back to top button