बीड : पितृपंधरवड्याचे जेवायला निघालेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
शेतातील शेजारच्या घरी जेवायला निघालेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. गोकुळ शिवाजी दहिफळे (वय १८) असे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या रेवकी शेतवस्तीवर शिवाजी दहिफळे यांचे कुटूंब राहते.सध्या पितृपंधरवाडा असल्याने त्यांचा शेजारी बंडू राऊत यांच्याकडे गोकुळ दहिफळे शनिवार (दि. ०२)सायंकाळी जेवणासाठी जात होता.
नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. जेवायला निघालेल्या गोकुळचा विद्युत तारेचा जबर धक्का बसला.
शेतातून गेलेल्या वीज पोलवरून वीज जोडणी घेतलेले वायर खाली हाेती. ती हातात घेताच गोकुळ यास विजेचा जबर धक्का बसला.
तो गंभीर जखमी झाला. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ बीड जिल्ह्यातील गेवराई उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले.
गोकुळ दहिफळेचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे पंचक्रोशीतील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
हेही वाचलं का?
- West Bengal Bypoll Results 2021 : ममता बॅनर्जी यांचा आज फैसला, बंगालमधील तीन जागांची पोटनिवडणुक मतमोजणी सुरु
- ramdas kadam audio clip : रामदास कदम, प्रसाद कर्वे आणि सोमय्या यांच्यातील कथित संवाद जसाच्या तसा !
- NCB raids drug party : मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या अलिशान जहाजातील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीची कारवाई
- शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर ! अनिल परबांविरुद्ध रामदास कदमांकडून सोमय्यांना रसद