Parbhani: सोयाबीनच्या गंजीला आग; अडीच लाखांचे नुकसान
पाथरी; पुढारी वृत्तसेवा : पाथरी तालुक्यातील गुंज येथील शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या गंजीला शनिवारी (दि. ५) आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये अंदाजे ४० क्विंटल इतकी सोयाबीनची गंजी जळून खाक झाली. ज्ञानोबा कुंडलिकराव नेमाने असे या नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. (Parbhani)
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील गुंज शिवारातील चार एकरमधील सोयाबीन काढून गंजी लावून ठेवली होती. शनिवारी (दि. ५) पहाटे ३ च्या सुमारास या गंजीस आग लागल्याने गंजी जाळून खाक झाली. दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित शेतकऱ्याचे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. (Parbhani)
दिल्लीतील हवा गुणवत्तेत किरकोळ सुधारणा
https://t.co/MxFc8wPfbr #pudharionline #PudhariNews #DELHIPOLLUTION #DelhiAirPollution #DelhiEnvirnment— Pudhari (@pudharionline) November 6, 2022
हेही वाचा