औरंगाबाद : चौघा भावांनी तरुणाला बेदम मारहाण करून मारून टाकले | पुढारी

औरंगाबाद : चौघा भावांनी तरुणाला बेदम मारहाण करून मारून टाकले

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : जुना वाद व शिवीगाळ केल्याच्या किरकोळ कारणावरून चौघा भावांनी तरुणाला बेदम मारहाण करीत त्‍याला गळा दाबून मारून टाकले. ही हृदयद्रावक घटना औरंगाबाद शहरातील मिसारवाडी भागात (सोमचार) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली.

सलीम मुस्तफा शहा (रा. मिसारवाडी) असे मृताचे तर, सुनिल पारधे, मनोज पारधे, सागर पारधे, प्रभुदास पारधे (सर्व रा.मिसारवाडी) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांना सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मृत सलीमचा भाऊ नाझीम मुस्तफा शहा (वय 28) याच्या फिर्यादीवरून सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या विषयी पोलिसांनी सांगितले, (सोमवार) रात्री 9 वाजता सलीम त्याच्या घराच्या ओट्यावर बसलेला होता. चारही संशयित आरोपी तेथे गेले. त्यांनी शिवीगाळ केल्याच्या व जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याला ओढत संघर्ष चौक येथे नेले. त्याला लाथाबुक्‍क्‍यांनी मारले. संशयीत आरोपी सुनिलने सलीमचा गळा दाबला. त्यातच तो जमिनीवर कोसळला. त्यास बेशुध्द अवस्थेत एमजीएम हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल केले. त्याला तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सिडको पोलिसांनी चारही संशयीत आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे करीत आहेत.

Back to top button