कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गोकुळधील 45 टँकर बंद केल्यामुळे आर्थिक फायदा थांबला असल्याच्या कारणावरून शौमिका महाडिक गोकुळवर आरोप करत आहेत, असे पत्रक गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी मंगळवारी प्रसिद्धीस दिले आहे. महाडिकांचे जावई विजय ढेरे यांचा दूध पॅकिंगचा ठेका रद्द केल्याचा राग आल्याने आरोप करण्यात येत असून गोकुळच्या दूध संकलनामध्ये गतवर्षीच्या तुलनेत प्रतिदिन 50 हजार लिटर तर मुंबईतील दूध विक्रीमध्ये गतवर्षाच्या तुलनेत वर्षाला 69 लाख लिटरची वाढ झाली आहे. पशुखाद्य विक्रीमध्ये 14 टक्के वाढ झाल्याचेही पत्रकात म्हटले आहे.