कोल्हापूर : ढगाळ वातावरणामुळे शेवटच्या दिवशी किरणोत्सव नाही

अंबाबाई मंदिर ( संग्रहित छायाचित्र )
अंबाबाई मंदिर ( संग्रहित छायाचित्र )
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाच्या पाचव्या व शेवटच्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव होऊ शकला नाही. दरम्यान, किरणोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून चौथ्या दिवसापर्यंत स्वच्छ-निरभ— वातावरणामुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला.

अंबाबाई मंदिरातील दक्षिणायन कालखंडातील किरणोत्सवांतर्गत पहिल्या चार दिवसांत मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या चरणापासून ते मुखापर्यंत पोहोचली. यामुळे मंदिरात येणार्‍या हजारो भाविक-पर्यटकांना स्थापत्यकलेचा आविष्कार पाहण्याची संधी मिळाली. मात्र, शेवटच्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव होऊ शकला नसल्याची माहिती देवस्थान समितीच्या वतीने जाहीर करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news