कोल्हापुरात बहरणार अर्जुन-रेवथीचे प्रेम

कोल्हापुरात बहरणार अर्जुन-रेवथीचे प्रेम

कोल्हापूर : सोनी मराठी वाहिनीवरील 'जिवाची होतिया काहिली' ही मालिका आणि अर्जुन-रेवथीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता हीच लाडकी जोडी मालिकेत कोल्हापूर शहर फिरणार आहे. आणि त्याचवेळी अर्जुन रेवथीकडे प्रेमाची कबुली देणार आहे. रेवथी अप्पांना दिलेले वचन मोडून अर्जुनला होकार देणार काय? दोघांच्या घरी कळेल का? अशा अनेक गोष्टींनी मालिकेचे पुढील भाग रंगणार आहेत.

रेवथीचे भरतनाट्यम स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्जुन काहीही करायला तयार आहे. रेवथीने स्पर्धा जिंकावी यासाठी अर्जुनने कोल्हापूरच्या अंबाबाईला नवस केलेला आहे आणि आता नवस पूर्ण करण्यासाठी अर्जुन आणि रेवथी अंबाबाईच्या मंदिरात जाणार आहेत. दर्शन झाल्यावर ते कोल्हापूरच्या पंचगंगा घाट, रंकाळ अशा अनेक ठिकाणी फिरणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या कोल्हापूर दर्शन होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news