राज्यात जलजन्य आजारांचा धोका वाढला

waterborne disease : 3 वर्षांत 10 लाख जणांना डायरिया, संसर्गजन्य कावीळ, टायफॉईड, गॅस्ट्रोचे दीड लाख रुग्ण
waterborne disease
जलजन्य आजार
Published on
Updated on
आशिष शिंदे

कोल्हापूर : दूषित पाण्यामुळे होणार्‍या जलजन्य आजारांचे संकट गंभीर बनले आहे. त्यातच परतीच्या पावसाने राज्यातील पाण्याचे साठे दूषित होण्याचे प्रमाण वाढल्याने राज्यात गॅस्ट्रो, डायरिया, संसर्गजन्य कावीळ, टायफॉईडसारख्या जलजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन वर्षांत तब्बल 12 लाखांहून अधिक जणांना जलजन्य आजारांची लागण झाली आहे, तर 65 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक 10 लाख 70 हजार 761 रुग्ण हे अतिसारचे असून, 1 लाख 49 हजार 978 रुग्ण गॅस्ट्रो, संसर्गजन्य, कावीळ, टायफॉईड, कॉलरा, लेप्टोस्पायरोसिसचे आहेत.

waterborne disease
राज्यात संसर्गजन्य आजारांनी आठ महिन्यांत ७५ जणांचा मृत्यू

दूषित पाणी व त्याद्वारे बनविलेल्या अन्नपदार्थांमुळे जलजन्य आजारांचा विळखा घट्ट होत चालला आहे. डायरिया अर्थात अतिसार हा त्यापैकीच एक. जास्त प्रमाणात जुलाब झाल्यास शरीरातील पाणी कमी होते. यामुळे डीहाड्रेशन होऊन मृत्यू होण्याचा धोका असतो. सध्या महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत अतिसाराच्या प्रादुर्भाव आहे.

दूषित पाणी पिल्याने, उघड्यावरील, हातगाड्यांवरील खाद्यपदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्याने जलजन्य आजारांचा धोका असतो. गेल्या वर्षभरातील जलजन्य आजारांचे प्रमाण धक्कादायक आहे. गेल्या वर्षभरात 3 लाख 25 हजार 927 जणांना अतिसारची लागण झाली आहे. 38 हजार 614 जणांना विषमज्वर (टाईफॉईड), 27 हजार 757 जणांना गॅस्ट्रो, 1 हजार 484 जणांना लेप्टोस्पायरोसिस तर 22 जणांना कॉलराची लागण झाली आहे. गंभीरबाब म्हणजे वर्षभरात 8 जणांचा लेप्टोस्पायरोसिसमुळे तर एकाचा कॉलरामुळे मृत्यू झाला आहे.

पावसाळा संपला तरीही जलजन्य आजारांचा धोका

सध्या ऐन हिवाळ्यात धुवाँधार पाऊस सुरू आहे. कमी वेळत मोठा पाऊस होत असल्याने नाले ओसंडून वाहू लागले आहेत. परिणामी, सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. यामुळे पावसाळा संपला, तरी जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे.

सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत दूषित होण्याची भीती आहे. यामुळे पाणी उकळून प्यावे, बाहेरचे अन्नपदार्थ खाण्याचे टाळावे. उलटी, जुलाबसारखी लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. साथरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जलजन्य आजारांवर सर्व सरकारी दवाखान्यांत मोफत उपचार केले जातात.
डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा आरोग्य अधिकारी
waterborne disease
संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्या ! महापालिकेचे नागरिकांना आवाहन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news