कोल्हापूर : ऐकावे ते नवलच; शेळीने जन्मला घातली चक्क पाच पिल्लं

कोल्हापूर : ऐकावे ते नवलच; शेळीने जन्मला घातली चक्क पाच पिल्लं
Published on
Updated on

सोहाळे : पुढारी वृत्तसेवा : आजरा तालुक्यातील लाटगाव गावातील शेतकरी अश्विनी रमेश चौगुले यांनी पालन केलेल्या शेळीने चक्क पाच पिलांना जन्म दिला आहे. यात दोन नर (बोकड) व तीन मादी (पाट) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, शेळी व जन्मलेली पाचही पिल्ले सदृढ असून त्याची प्रकृती ठणठणीत आहे.

निसर्गाची लीला काही औरच असते. नेहमी एक, दोन, तीन व अपवादात्मक वेळी चार पिलांना जन्म दिलेल्या शेळीविषयी ऐकण्यात आले असेल. परंतु, आजरा तालुक्यातील लाटगाव गावातील एका शेळीने चक्क पाच पिल्लांना जन्म दिला आहे. निसर्गात कधी काय घडेल याचा नेम नसतो, याचाच प्रत्यय लाटगावमध्ये आला आहे.

लाटगावातील शेतकरी अश्विनी चौगुले यांचा शेतीचा व्यवसाय आहे. त्याला जोडधंदा म्हणून ते शेळीपालन करतात. सोमवारी त्यांच्या एका शेळीने एकाचवेळी तब्बल पाच पिल्लांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे, शेळी व जन्मलेली पाचही पिल्ले सदृढ असून प्रकृती ठणठणीत आहे. ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरताच अनेक नागरिक शेळी व पिल्लांना पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. आतापर्यंत तीन किंवा चार पिल्लं शेळीला होतात हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु, शेळीली पाच पिल्ल झाल्याने आश्रर्यचकित व्यक्त होत आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news