कोल्हापूर : टोप-कासारवाडी फाट्यावर खड्ड्यातील पाण्यात कागदी बोट सोडून विद्यार्थ्यांचे आंदोलन

कोल्हापूर : टोप-कासारवाडी फाट्यावर खड्ड्यातील पाण्यात कागदी बोट सोडून विद्यार्थ्यांचे आंदोलन
Published on
Updated on

कासारवाडी, टोप-कासारवाडी फाट्यावर स्थानिक नागरिक व शालेय विद्यार्थ्यांनी खड्ड्यातील पाण्यात कागदी बोट सोडून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून कासारवाडी फाटयामार्गे जोतिबा, पन्हाळ्याला जाण्यास राज्य मार्ग आहे. येथे सुमारे १०० ते २०० मीटर अंतरावर आजूबाजूचे नाल्याचे पाणी आल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तीर्थक्षेत्र जोतिबा व ऐतिहासिक पन्हाळा गडाकडे जाण्यासाठी हा मार्ग असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी असते. शिवाय जवळच औद्योगिक वसाहत असल्याने कामगार व शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू असते.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी नसल्याने पाणी रस्त्यावर येते. येथे अनेक खड्डे पडल्याने नेमका वाहन चालकाला अंदाज येत नाही. यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होतात. काहींच्या गाड्या बंद पडतात तर विद्यार्थ्यांना यातून चालत जाणे जोखमीचे झाले आहे. खड्डा चुकवण्यासाठी चालक उलट दिशेने गाडी चालवतात.या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी व स्थानिक नागरिकांनी पाण्यात कागदी बोट सोडत अनोखे आंदोलन केले.यावेळी संतोष शिंदे, कृष्णात माने, मोहन जोंधळे, नामदेव घाटगे, सतीश घाटगे, रोहित मुळीक यांच्याासह नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

रस्त्यावरील खड्डयांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही सुरू करावी, अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल.
अच्युत खोत, सरपंच, कासारवाडी

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news