गुडाळ : आशिष पाटील
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आणखी कमी झाल्यामुळे आज (शनिवार) सायंकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी धरणाचा क्र 4 चा दरवाजा बंद झाला आहे. तर पाठोपाठ 7 वाजून 10 मिनीटांनी 5 क्रमांकाचा दरवाजाही बंद झाला आहे. आता स्वयंचलित दरवाज्यापैकी केवळ सहा व सात क्रमांकाचे एकूण दोन दरवाजे सुरू असून हे दोन दरवाजे आणि पॉवर हाऊस मधून एकूण 4356 एवढा विसर्ग सुरू आहे.
कोल्हापुरात पंचगंगेच्या पुराच्या पाण्याची पातळी वाढत असतानाच राधानगरीतून कमी होत जाणारा विसर्ग हा काहीसा दिलासादायक ठरणार आहे.
राधानगरी धरणाचे चार आणि पाच क्रमांकाचे दरवाजे बंद झाल्यानंतर कोल्हापूर वासियांना दिलासा मिळाला आहे. सायंकाळी 7 वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी 47 फूट 07 इंचावर आहे. तर पाण्याचा विसर्ग 66437 क्युसेकने सुरु आहे. तर जिल्ह्यातील एकूण 38 बंधारे पाणीखाली आहेत.