जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : येथील गट नंबर 1251 मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा झाला पाहिजे. या मागणीसाठी सोमवारी (दि.२९) सकाळी मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, मुख्याधिकारी तैमुर मुलाणी उपस्थित नसल्याने प्रचंड आंदोलन तापल्याने आंदोलकांनी सांगली कोल्हापूर महामार्गावर चक्का जाम करण्यात आला आहे.
या चक्का जाममुळे सांगली -कोल्हापूर महामार्गावर उदगाव ते सांगली मिरज तर कोल्हापूर मार्गावर चिपरी फाटा, इचलकरंजी फाटा पर्यत वाहतूक ठप्प झाली होती. तर जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, कोल्हापूर येथील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर मुख्याधिकारी जो पर्यत येत नाहीत तो पर्यत उठणार नसल्याची भूमिका आंदोलकांची आहे.