उन्हाची वाढती तीव—ता व एकूण शिल्लक जलसाठा लक्षात घेता, पाणीटंचाईचे सावट गडद होत आहे. दैनंदिन जीवनात पाण्याचा गरजेपेक्षा अधिक वापर होत आहे. त्यामुळे सांडपाण्याचे प्रमाण वाढत आहे. शिवाय नदीपात्रात कपडे, धुणे, जनावरे व वाहने धुण्यामुळे नदी प्रदूषणात भर पडत आहे. दिवसेंदिवस वाढत्या प्रदूषणामुळे मासे, जल वनस्पती व सूक्ष्म जीव नष्ट होत आहेत. परिणामी, नैसर्गिक साधनसंपत्ती धोक्यात येऊ लागली आहे. शिवाय प्रदूषणामुळे विविध आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. पाण्याचा जपून वापर करणे व पाणी प्रदूषण टाळणे हीच पाणी समस्येवर मात ठरणार आहे.