![कोल्हापूर : सोळांकूर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकर्याचा मृत्यू](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F01%2F%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सरवडे; पुढारी वृत्तसेवा : सोळांकूर येथे अज्ञात वाहनांची धडक बसल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचे नाव अशोक दौलू कांबळे ( वय ५२) असे आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अशोक कांबळे हे आपल्या माऊली नावाच्या शेतात पाणी पाजण्यासाठी गेले होते. पाणी पाजून रात्री उशिराने ते घरी परत येत असताना गावानजीकच्या बाळूमामा मंदिराजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्री घडल्यामुळे याची माहिती सर्वांना उशिराने मिळाली.
अशोक यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट व हालाखीची आहे. अशोकचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. तपास राधानगरी पोलीस करत आहेत.
हेही वाचा :