कोल्हापूर : दिवसाआडच पाणीपुरवठा राहणार

file photo
file photo
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहर आणि परिसरात अद्याप अपेक्षित पाऊस नसल्याने शहरातील काही भागांची तहान भागविणार्‍या कळबां तलावात अद्याप पाणी नाही. तर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडत असल्याने भोगावती आणि पंचगंगा नदीत पाण्याची पातळी वाढत आहे. तरीही जोपर्यंत कळंब्यात पाणी येत नाही. तोपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यावाचून पर्याय नसल्याचे महापालिका अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

पाऊस लांबल्यामुळे आणि धरणामध्ये पाणीसाठी कमी असल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. 23 जूनपासून पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आणखीन काही दिवस एक दिवस आड पाणीपुरवठा करावा लागेल, असे महापालिकेचे जलअभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.

गुरुवारी आषाढी एकादशी आणि बकरी ईद दोन्ही असे सण होते. त्यामुळे शहरात कोठेही अपुरे पाणीपुरवठा होणार नाही, याद़ृष्टीने महापालिकेने प्रयत्न केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news