पवन मोहिते
कसबा बावडा : पंचगंगा पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने उघडकीप दिली आहे. गेल्या २४ तासात पाणी पातळी ०५ इंचाने वाढली. शनिवारी (दि.२७) सकाळी ९ वाजता राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी ४७ फूट ०२ इंच होती. रविवारी (दि.२८) सकाळी ९ वाजता पाणी पातळी ४७ फूट ०७ इंचावर पोहोचली आहे.
शनिवारी (दि.२७) रात्री ९ पासून रविवार (दि.२८) पहाटे ५ पर्यंत ०८ तास पंचगंगगेची पाणी पातळी ४७ फूट ८ इंचावर स्थिर होती. सकाळी ६ वाजता पाणी पातळी १ इंचाने कमी होऊन ४७ फूट ७ इंच झाली आहे. गेले तीन तास पाणी पातळी स्थिर आहे. कसबा बावडा एमआयडीसी-शिरोली (शिये) मार्गावर तस्ते ओढा येथे रस्त्यावर पाणी आले आहे. पाणीपातळीत वाढ झाल्याने वाहतूक बंद केली आहे.