Kolhapur news | ...मृग संपला, तरी पाऊस नाही; मेंढपाळांची वेदनादायी भटकंती सुरूच

चारा-पाण्याअभावी संसार पाठीवर घेऊन पंढरपूर, विजापूरच्या दिशेने स्थलांतर
Kolhapur news | ...मृग संपला, तरी पाऊस नाही; मेंढपाळांची वेदनादायी भटकंती सुरूच
Published on
Updated on

बिरू व्हसपटे

शिरढोण : शेतीला नवसंजीवनी देणारे मृग नक्षत्र संपले, तरीही पावसाने दडी मारल्याने मेंढपाळ समाजाच्या अडचणी आणखी तीव्र झाल्या आहेत. चारा आणि पाण्याच्या भीषण टंचाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह दुष्काळी व कमी पावसाच्या पट्ट्यातील शेकडो मेंढपाळांना आपल्या कुटुंबासह आणि मेंढ्यांच्या लवाजम्यासह पंढरपूर, विजापूर व इतर भागांकडे स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि मुक्या जनावरांना जगवण्यासाठी सुरू असलेला हा संघर्ष दिवसेंदिवस अधिक वेदनादायी बनत आहे.

गतवर्षीच्या अपुऱ्या पावसानंतर यंदाही समाधानकारक पर्जन्य झाला नसल्याने शेतातील हिरवा चारा संपुष्टात आला आहे. विहिरी, तलाव, ओढे आणि अन्य जलस्रोत कोरडे पडल्याने जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी, मेंढपाळांना दररोज अनेक किलोमीटर पायी प्रवास करून चारा आणि पाणी शोधावे लागत आहे.

Kolhapur news | ...मृग संपला, तरी पाऊस नाही; मेंढपाळांची वेदनादायी भटकंती सुरूच
Satara Water Scarcity : माण तालुक्यात दुष्काळाची दाहकता तीव्र

डोक्यावर संसाराचे ओझे, हातात लेकरांचा आधार आणि मागे शेकडो मेंढ्यांचा ताफा घेऊन हा समाज रस्त्यावरची भटकंती करत आहे. उन्हाच्या झळा, भूक, तहान आणि असुरक्षिततेचा सामना करत अनेक कुटुंबे दिवस कंठत आहेत. महिलांना, वृद्धांना आणि लहान मुलांना या स्थलांतराचा सर्वाधिक फटका बसत आहे.

Kolhapur news | ...मृग संपला, तरी पाऊस नाही; मेंढपाळांची वेदनादायी भटकंती सुरूच
Ratnagiri Water Scarcity : एकाच टँकरवर भागतेय ११ गावांची तहान

शासनाच्या विविध योजनांपासून कायम दूर राहिलेल्या या शोषित समाजाला आजही ठोस मदतीची प्रतीक्षा आहे. मृग नक्षत्र संपूनही पाऊस न झाल्याने आणि चारा-पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने मेंढपाळांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Kolhapur news | ...मृग संपला, तरी पाऊस नाही; मेंढपाळांची वेदनादायी भटकंती सुरूच
Rajgurunagar Drought: राजगुरुनगरमध्ये पाणीटंचाईचे गंभीर संकट; चासकमान धरणात केवळ ५.७८ टक्के पाणी

मेंढपाळांच्या व्यथा कोण जाणणार?

चारा आणि पाण्याच्या शोधात मेंढपाळांना रोज अनेक किलोमीटर पायी भटकावे लागत आहे. स्थलांतरामुळे मुलांचे शिक्षण खंडित होत असून महिलांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या पडत आहेत. जनावरांचे संगोपन, निवारा आणि उदरनिर्वाह यांचा प्रश्न गंभीर बनला असून शासनाने तातडीने चारा छावण्या व मदत योजना सुरू करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news