मोठी बातमी : कोल्हापुरातील बस्तवडे येथील वेदगंगा नदीत ४ जण बुडाले, तिघांचे मृतदेह मिळाले | पुढारी

मोठी बातमी : कोल्हापुरातील बस्तवडे येथील वेदगंगा नदीत ४ जण बुडाले, तिघांचे मृतदेह मिळाले

पुढारी ऑनलाईन डेस्क : कागल तालुक्यातील बस्तवडे बंधारा येथे वेदगंगा नदीत बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.१७) दुपारी घडली आहे. तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत, तर एकाचा शोध सुरू आहे. ग्रामस्थांनी दोन महिलांसह तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. आणुर गावाच्या यात्रेसाठी पाहुण्यांच्या घरी आलेले नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्यानंतर चौघांचा बुडून मृत्यू झाला.

जितेंद्र विलास लोकरे (वय 36, मुरगूड), रेश्मा दिलीप येळमल्ले (वय 34, अथणी, कर्नाटक), सविता अमर कांबळे (वय 27 रुकडी), यश दिलीप येळमल्ले (वय 17, अथणी, कर्नाटक) अशी बुडालेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा 

Back to top button