Kolhapur Bus Accident : गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या खासगी बसचा कोल्हापूरजवळ अपघात; एकाच कुटुंबातील तिघे ठार
पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापुरातील पुईखडीजवळ गोव्याहून मुंबईला जाणारी खासगी बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाल्याची माहिती मिळत आहे. आज (दि.२३) पहाटे २ च्या सुमारास ही घटना घडली.
मुंबईला जाणारी ही बस बुधवारी रात्री ८ वाजता पणजीहून निघाली होती. आज पहाटे २ वा. च्या सुमारास कोल्हापुरातील पुईखडीजवळ बस आली असता प्रवासादरम्यान एका वळणावर उलटली. यामध्ये पुण्यातील एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला. बसमध्ये २५ प्रवाशी होते. अपघाताची माहिती मिळताच करवीर पोलीस आणि अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचावकार्य राबवत बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये हलविण्यात आले आहे.
हेही वाचा :
- Visakhapatnam Accident : शाळकरी मुले थोडक्यात बचावली, भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
- पुण्यात विचित्र अपघात; एसटी बसने पाच वाहनांना उडवले
- Sangli Accident : गुहागर-विजापूर महामार्गावर अपघात: बेणापूरचे २ तरुण ठार, १ जखमी