कोल्हापूर : संताजी घोरपडे कारखान्याची ऊस वाहतूक बेलेवाडी काळम्मा येथे रोखली | पुढारी

कोल्हापूर : संताजी घोरपडे कारखान्याची ऊस वाहतूक बेलेवाडी काळम्मा येथे रोखली

माध्याळ : पुढारी वृत्तसेवा – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या संताजी घोरपडे या कारखान्याची ऊस वाहतूक बेलेवाडी काळम्मा या गावात रोखण्यात आली. सकाळपासून स्वाभिमानीचे पदाधिकारी ऊसतोडी व वाहतूक बंद करण्यासाठी भागात फिरत होते. आज दुपारी १२ वाजता बेलेवाडी काळम्मा येथे ऊस वाहतूक रोखून धरण्यात आली. जवळपास २० ते २५ ट्रॅक्टर रोखून धरण्यात आले. यावेळी आपल्यासाठी लढणारी माणसं सकाळपासून फिरत असल्याने अजून ऊपाशीच असतील हे ओळखून बेलेवाडी ग्रामस्थांनी गावातून भाकरी गोळा करून सर्व कार्यकर्ते व शेतकऱ्यांची जेवणाची व्यवस्था केली. उपाशीपोटी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांवर गावकऱ्यांनी दाखविलेल्या या प्रेमामुळे आंदोलनातील कार्यकर्त्यांची पोटातील भूक शांत झाली आणि लढण्यास पुन्हा ऊर्जा मिळाली.

 

Back to top button