कारखान्यांकडून 817 कोटींची एफआरपी अद्याप थकीत

कारखान्यांकडून 817 कोटींची एफआरपी अद्याप थकीत
Published on
Updated on

राशिवडे, पुढारी वृत्तसेवा : गेला गळीत हंगाम संपून आगामी हंगाम सुरू होण्यास काही महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला असताना राज्यातील कारखान्यांनी अद्यापही 817 कोटींची शेतकर्‍यांची एफआरपी अदा केलेली नाही. संबंधित कारखान्यावर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
राज्यातील अनेक साखर कारखान्यांकडे शेतकर्‍यांच्या उसाची एफआरपी थकीत आहे. आता थकीत एफआरपी ठेवणार्‍या कारखान्यांच्या विरोधात राज्य सरकारने कारवाईची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीने कारखानदार एफआरपी अदा करणार का, असा प्रश्न आहे.

2022/23 मधील गाळप हंगामात 211 साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांकडून उसाची खरेदी केली होती. त्यातील 125 कारखान्यांनी 100 टक्के एफआरपी अदा केली आहे. 79 कारखान्यांनी 80 ते 99 टक्के एफआरपी दिली आहे. दोन कारखान्यांनी 60 ते 80 आणि पाच कारखान्यांनी 50 टक्केच एफआरपी दिली आहे. यातील नऊ कारखान्यांच्या विरोधात महसूल वसुली प्रमाणपत्र जारी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news