कोल्हापूर : अन्नातून विषबाधा; तीन कुटुंबांतील 9 अत्यवस्थ | पुढारी

कोल्हापूर : अन्नातून विषबाधा; तीन कुटुंबांतील 9 अत्यवस्थ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जेवणात मशरूम खाल्ल्याने विषबाधा होऊन रुकडी (ता. हातकणंगले) येथील तीन कुटुंबांतील 9 जणांची प्रकृती अत्यवस्थ बनली आहे. त्यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी ही घटना घडली.

रजिया गुलाब पठाण (वय 55), इब्राहिम गुलाब पठाण (35), नाझरिन सद्दाम नदाफ (28), हलिना गुलाब नदाफ (65), मुमताज ईस्माईल नदाफ (45), मुसब सद्दाम नदाफ (9), मिसबा सद्दाम नदाफ (3), जन्नत इर्शाद शेख (35), फारुक इर्शाद शेख (22, रा. रुकडीवाडी, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत.

शनिवारी रात्री जेवणावेळी या सर्वांनी मशरूमची भाजी खाल्ली होती. पहाटेपासून त्यांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. घटनेची सीपीआर पोलिस चौकीत नोंद झाली आहे.

Back to top button