कोल्हापूर : ढगाळ वातावरणामुळे शेवटच्या दिवशी किरणोत्सव नाही | पुढारी

कोल्हापूर : ढगाळ वातावरणामुळे शेवटच्या दिवशी किरणोत्सव नाही

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाच्या पाचव्या व शेवटच्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव होऊ शकला नाही. दरम्यान, किरणोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून चौथ्या दिवसापर्यंत स्वच्छ-निरभ— वातावरणामुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला.

अंबाबाई मंदिरातील दक्षिणायन कालखंडातील किरणोत्सवांतर्गत पहिल्या चार दिवसांत मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या चरणापासून ते मुखापर्यंत पोहोचली. यामुळे मंदिरात येणार्‍या हजारो भाविक-पर्यटकांना स्थापत्यकलेचा आविष्कार पाहण्याची संधी मिळाली. मात्र, शेवटच्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव होऊ शकला नसल्याची माहिती देवस्थान समितीच्या वतीने जाहीर करण्यात आली.

Back to top button