महिला शेतकर्‍यांवर ओढवलेल्या संकटात जिल्हा प्रशासनाची साथ | पुढारी

महिला शेतकर्‍यांवर ओढवलेल्या संकटात जिल्हा प्रशासनाची साथ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोरोनामुळे पतीचे निधन झालेल्या विधवा महिला शेतकर्‍यांना कृषी विभाग आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोफत बियाणे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 1270 महिला शेतकर्‍यांना 115 क्‍विंटल सोयाबीन, 62 क्‍विंटल भूईमूग, 92 क्‍विंटल भाताचे बियाणे देण्?यात येत असून यापैकी भाताचे बियाणे वाटप करण्यात आले आहे. भूईमूग व सोयाबीन बियाणे वाटप करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.

जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी कौतुक केले. तसेच राज्यभर हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे कोल्हापूर दौर्‍यावर आल्या असताना कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना सहाय्य करण्याबाबत त्यांनी बैठकीत सुचविले होते. या विचारातून कृषी विभागाने विधवा महिला शेतकर्‍यांना मोफत बियाणे देण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले होते. त्यानुसार कृषी विभाग व जिल्?हा प्रशासनाने नियोजन सुरू केले होते. महिलांच्या अडी-अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे, असे जिल्?हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.

या उपक्रमाला कोल्हापूर बियाणे असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांचे सहकार्य लाभले. त्?यांनी पुढाकार घेत सर्व बियाणे विक्रेत्यांना बियाणे देण्?याचे आवाहन केले. त्?यामुळे 1270 हून अधिक महिलांना सोयाबीन, भूईमूग आणि भात पिकांचे बियाणे मोफत देण्यात येत आहे. कृषी विभाग, महाबीज व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भाजीपाला बियाण्यांच्या मिनी किट्सचे देखील या महिलांना वाटप करण्यात येणार असल्याचेही रेखावार यांनी सांगितले.

Back to top button