कोल्हापूर : पुरात ज्यांची जनावरे वाहून जातील, त्यांच्यावरच होणार कारवाई

कोल्हापूर : पुरात ज्यांची जनावरे वाहून जातील, त्यांच्यावरच होणार कारवाई
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
पुराने बाधित होणार्‍या गावांत जनावरे वाहून गेली, त्यांच्या चारा-पाण्याची योग्य व्यवस्था झाली नाही, तसेच पशुपालकांचा याबाबत हलगर्जीपणा सिद्ध झाला, तर संबंधित मालकांवर प्राणी क्लेष प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. ही माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी दिली.

संभाव्य पूरस्थितीबाबत पशुसंवर्धन विभाग दक्ष असला, तरी पशुपालकांनी आपल्या जनावरांना योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची दक्षता घ्यावी, तसेच चारा व पशुखाद्याची योग्य ठिकाणी साठवणूक करावी. जनावरे स्थलांतराअभावी पुरात वाहून गेल्यास व पशुपालकांचा हलगर्जीपणा सिद्ध झाल्यास त्याच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. स्थलांतरित, छावणीतील जनावरांकरिता ग्रामस्तरावर चारा वाटप समितीचे गठण करण्यात आले आहे. याबरोबरच अतिरिक्त मनुष्यबळाबाबत नियोजन असून महिला अधिकारी, कर्मचारी यांच्या सोबत अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. जिल्ह्यातील कार्यरत विविध सेवाभावी संस्था, गोशाळा, पांजरपोळ, सहकारी दूध संस्था यांनी छावणी उभारणीसंदर्भात अटी व शर्तींचा मसुदा संबंधित तहसील कार्यालयातून उपलब्ध करून घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

यावर्षी संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्यापूर्वी पूर बाधित होऊ शकणार्‍या कुक्कुट शेडधारकांनी शेडमधील सर्व कुक्कुट पक्ष्यांची विक्री करावी किंवा कुक्कुट शेड रिकामे ठेवावेत. यामध्ये हलगर्जीपणा करणार्‍यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही डॉ. पठाण यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news