गुडाळ : आशिष पाटील
राधानगरी धरणातून काल (शनिवार) सायंकाळ पासून दोन स्वयंचलित दरवाजे आणि पॉवर हाऊस मधून पाणी सोडण्यात येत आहे. असे असले तरी धरण क्षेत्रात आज (रविवार) दिवसभर पावसाची रिमझिम सुरू असल्याने पाणी पातळी स्थिर आहे. अद्यापही धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे सुरूच आहेत.
जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज (रविवार) दुपारी चार वाजता केलेल्या मोजणी प्रमाणे पाणी पातळी 346.75 एवढी आहे. तर 8217.68 दशलक्ष घन मीटर पाणीसाठा आहे. धरणक्षेत्रात दुपारी चार पर्यंत 32 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रात एक जून पासून आज अखेर 3388 मि.मी. पाऊस झालेला आहे.