

कोल्हापूर : अनिल देशमुख
शिवभोजन केंद्रांवर अनियमितता आढळल्यास ते केंद्र आता बंद होणार आहे. या अनियमितता तपासण्यासाठी पथके तयार करा आणि कारवाई करा, असे आदेश राज्य शासनाने पुरवठा विभागाला दिले आहेत. गरजू आणि गरिबांना दहा रुपयांत पोटभर भोजनासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी ही योजना सुरू केली आहे. त्याला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या योजना राबविणार्या काही केंद्रांत गैरप्रकारही होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवभोजन केंद्रांवर सीसीटीव्ही बसवणे सक्तीचे करण्यात आले आहे.
शिवभोजन थाळी आणि केंद्रांच्या तपासणीसाठी आता पथके तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पथकांकडून नियमित आणि अचानक तपासणी करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. मंजूर केलेली पण अद्याप सुरू न झालेल्या केंद्रांना नोटिसा बजावून ती रद्द करण्याचेही आदेश दिले आहेत. यासह केंद्रांवर अनियमतता आढळल्यास कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या अनियमिततेमुळे होणार कारवाई