पुणे : गेले तीन दिवस राज्यातील बहुतांश भागात सुरू झालेला पावसाने सर्वदूर हजेरी लावली. मात्र, तो अजून तीन दिवस सुरू राहणार, असा अंदाज असताना मंगळवारी मात्र त्याचा जोर अचानक कमी झाला. आता १५ जुलैपर्यंत कोकणातच पावसाचा अतिवृष्टीचा जोर असेल.
मराठवाडा, विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा, तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते मध्यम असा संमिश्र पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईसह कोकणात गेले ४८ तास जोरदार पाऊस झाला.