

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास समुद्रात?बुडणार्या?तीन तरुणांना वाचवण्यात स्थानिक जीवरक्षक व व्यावसायिकांना यश आले.
ही घटना समुद्रकिनार्यावर असलेल्या स्वच्छतागृह इमारतीच्या समोरील चाळात घडून आली. याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगर या ठिकाणाहून गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी व देवदर्शनासाठी पाच तरुण आले होते . त्या पाच तरुणांपैकी रामहरी राजपूत (25) , किशन वाघमारे (30) व सुनील जाधव (25 ) हे तिघेजण हे आंघोळीसाठी समुद्रात उतरले होते.
गणपतीपुळे येथील समुद्राची स्थिती अद्यापही धोकादायक आहे. तसेच समुद्राच्या लाटांचा जोरही कायम आहे. आंघोळीसाठी उतरलेले हे तरुण अचानक खोल पाण्यात ओढले गेले. त्यांना बाहेर येणे मुश्किल झालेले असताना त्यांनी आरडाओरडा केला. यावेळी किनार्यावर असलेले गणपतीपुळे ग्रामपंचायतचे जीवरक्षक उमेश म्हादे, अनिकेत चव्हाण यांनी तात्काळ स्थानिक व्यावसायिकांना माहिती देऊन समुद्राकडे धाव घेतली.
जीवरक्षक उमेश म्हादे व अनिकेत चव्हाण यांनी व्यावसायिक ओंकार शेलार, फोटोग्राफर रुपेश पाटील गणपतीपुळे उपसरपंच संजय माने यांनी समुद्रात जाऊन या तिन्ही तरुणांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले. यानंतर याविषयीची माहिती गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राला देण्यात आल्यानंतर पोलिसांनी या घटनेची पाहणी करून बुडणार्या तरुणांना वाचवण्यात धाडसी कामगिरी केलेल्या जीव रक्षक व स्थानिक व्यवसायिकांचे कौतुक केले. या घटनेनंतर आलेल्या पर्यटकांनी गणपतीपुळे समुद्राच्या धोक्याची स्थिती लक्षात घेऊन खोल पाण्यात उतरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.