

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज मागे घ्यायच्या पहिल्या दिवशी चारजणांनी अर्ज मागे घेतले. शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारनंतर किती उमेदवार रिंगणात राहणार आणि कुणा-कुणाच्यात लढत होणार हे स्पष्ट होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले, की रत्नागिरी नगर परिषदच्या निवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज मागे घेण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. आज तिघांनी अर्ज मागे घेतले आहेत. प्रभाग 5 ब मधून मंजुळा विजय कदम, प्रभाग 4 ब मधून रोहन दिनेश वरेकर, प्रभाग 4 ब मधून वक्रतुंड उमेश शेट्ये आणि प्रभाग 9 अ मधून शुभम रमेश सोळंकी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.