Ratnagiri News : नूतन वर्षात अंत्योदयसाठी मिळणार 20 किलो तांदूळ, 15 किलो गहू

रास्त दुकानदार, लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी -जिल्हा पुरवठा विभागाचे आवाहन
ration scheme update
अंत्योदयसाठी मिळणार 20 किलो तांदूळ, 15 किलो गहू file
Published on
Updated on

रत्नागिरी : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना अंतर्गत लाभार्थ्यासाठी वितरीत करावयाचे अन्नधान्याचे मासिक नियतन प्रमाणामध्ये बदल करण्यात आला आहे. अंत्योदय शिधापत्रिकेसाठी 20 किलो तांदूळ, 15 किलो गहू मिळणार आहे.

ration scheme update
Ration Shops | मागण्या पूर्ण न झाल्यास रेशन दुकानदार संपावर जाणार

त्यानुसार जिल्ह्यातील अंत्योदय कार्डधारकांकरिता तांदूळ प्रती शिधापत्रिका 20 किलो व गहू प्रती शिधापत्रिका 15 किलो वाटप आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या प्रति सदस्यांसाठी 3 किलो तांदूळ व 2 किलो गहू असा बदल करण्यात आला आहे. हा बदल माहे जानेवारी 2026 पासून वितरीत करण्यात येणाऱ्या धान्यासाठी लागू असणार आहे. माहे डिसेबर 2025 साठी पुर्वीचेच प्रमाण म्हणजेच अंत्योदय कार्डधारकांसाठी तांदूळ प्रती शिधापत्रिका 25 किलो व गहू प्रती शिधापत्रिका 10 किलो वाटप आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या प्रति सदस्यांसाठी 4 किलो तांदुळ व 1 किलो गहू असे आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही याची सर्व रास्त धान्य दुकानदार व लाभार्थी यांनी नोंद घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत यांनी केले आहे.

ration scheme update
शिधापत्रिका होणार लवकरच ऑनलाईन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news