रत्नागिरी: निवेंडी येथे कौटुंबिक वादातून मुलाकडून वडिलाचा खून
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील निवेंडी येथे कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात वडिलांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.13) सकाळी 11.30 च्या सुमारास उघडकीस आली. जयगड पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.
सुरेश नावजी कदम (वय 60, रा. निवेंडी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या वृध्द वडिलांचे नाव आहे. या खुनप्रकरणी मुलगा राजेश सुरेश कदम (वय 40, रा. निवेंडी, रत्नागिरी) याला जयगड पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी सुरेश कदम आणि त्यांचा मुलगा राजेश यांच्यात कौटुंबिक कारणातून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने राजेशने रागाच्या भरात वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यात दांडक्याचा मार वर्मी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत जयगड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मुलगा राजेशला अटक केली. मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी राजेशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जयगड पोलीस करत आहेत.
हेही वाचा