रत्नागिरी : विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी : विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
Published on
Updated on

चिपळूण, पुढारी वृत्तसेवा : शहरातील एका सदनिकेत विज जोडणीचे काम करत असताना तरुणाला वीजेचा धक्का बसला. यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना कापसाळ येथे शुक्रवारी (दि.१८) घडली. प्रथमेश प्रकाश साळवी (वय २४, मधलीवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश हा शहरातील पागनाका येथील गृह संकुलातील सदनिकेत वीज जोडणीचे काम करत होता. हे काम सुरू असताना दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यात तो बेशुद्ध पडला. त्याला काहींनी लागलीच कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले.

प्रथमेश हा हरहुन्नरी, कष्टाळू होता. आयटीआय झाल्यानंतर त्याने इलेक्ट्रिकल डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. घरी आई आणि दोन बहिणींसह राहणारा प्रथमेश इलेक्ट्रिकची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. मात्र, त्याच्या एकाएकी मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. प्रथमेशच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी शोक व्यक्त केला.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news