रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा
Published on
Updated on

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात उद्या अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा (अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक) विद्यालयांना उद्या गुरुवारी (दि. २७) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसुचनेनुसार जिल्ह्यात उद्या २७ जुलै रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. संगमेश्वर येथील शास्त्री नदी, राजापूर येथील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी उद्या २७ जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. असा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिला आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news