Ratnagiri : धक्कादायक! वणव्यात शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

Ratnagiri : धक्कादायक! वणव्यात शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा तारवेवाडी येथे काजू बागेत लागलेल्या वनव्यामध्ये आग विझवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गोविंद विश्राम घवाळी (वय ६५ ) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. वनवा विझवताना आगीत होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील, सरपंच यांनी घटनास्थळी धाव घेतली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news