रत्नागिरी : केंद्रीय मंत्र्यांना माध्यमांचे वावडे? लोकसभा मतदारसंघाचा दौरा कार्यक्रमात माध्यमांना भेट नाकारली

रत्नागिरी : केंद्रीय मंत्र्यांना माध्यमांचे वावडे? लोकसभा मतदारसंघाचा दौरा कार्यक्रमात माध्यमांना भेट नाकारली
Published on
Updated on

खेड; पुढारी वृत्तसेवा : आगामी सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीला पावणेदोन वर्षांचा कालावधी शिल्लक असला, तरी भाजपने राज्यातील काही महत्त्वाच्या लोकसभा मतदरसंघांत लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी केंद्रीय मंत्री लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत असून सोमवार दि. 22 पासून केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग व जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी रायगड लोकसभा मतदार संघाचा दौरा खेडमधून सुरू केला. मात्र, या दौर्‍यात त्यांनी माध्यम प्रतिनिधींना दूरच ठेवले.

दौर्‍याअंतर्गत रविवारी मंत्र्यांचे खेडमध्ये आगमन झाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अपयश आलेल्या 16 मतदारसंघांवर भाजपने विशेष लक्ष दिले असून, नऊ केंद्रीय मंत्री या मतदारसंघांत ठाण मांडणार आहेत. पुढील 18 महिन्यांच्या कालावधीत तब्बल सहा वेळा केंद्रीय मंत्री त्यांच्यावर जबाबदारी दिलेल्या मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. यानुसार रायगड आणि शिर्डी मतदारसंघाची ना. प्रल्हाद पटेल यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रत्येकी 3 दिवसांच्या या दौर्‍यात 21 कार्यक्रमांची रचना करण्यात आली असून, या काळात पक्षीय बदल, स्थानिक पातळीवरील अडचणी, संघटनात्मक कार्यक्रम, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असे कार्यक्रम नियोजित करण्यात आले आहेत.

रायगड मतदारसंघात भाजपची ताकद अत्यल्प आहे. मात्र, शिवसेनेने पडलेल्या फुटीमुळे आगामी निवडणुकीत चमत्कार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दौर्‍यात केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या आहेत की नाही, धार्मिकस्थळांना भेटी, आध्यात्मिक गुरूंच्या गाठीभेटी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटी, सहकार क्षेत्रातील अग्रणी नेते, व्यापारी, वकील, डॉक्टर यांच्या वेगवेगळ्या बैठका, पत्रकार संवाद, सर्व स्तरावरील संघटनात्मक, शासकीय अधिकारी यांच्या बैठका तसेच स्वस्त धान्याच्या दुकानातदेखील देणे अपेक्षित आहे.

ना. पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधलाच नाही. केंद्र सरकारकडून राबवलेल्या योजना सर्वसामान्यांपर्यंत नीटपणे पोहोचत आहेत का? याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री जागोजागी जातील व आपल्या अन्न प्रक्रिया उद्योग व जलशक्ती मंत्रालयामार्फत कोकणातील जनतेसाठी केंद्र सरकार कोणते नियोजन करत आहे, याची माहिती देतील, अशी अपेक्षा होती; मात्र तसे घडले नाही. केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना पुढील पाच वर्षांत एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर राबविला जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news